रमाई
रमाईचा जन्म झाला ७ फेब्रुवारी १८९८ रोजी वणंदगावला
आईचे नाव रुक्मिणीबाई वडील भिकु धुत्रे होती समाधान ||
कुटुंब मोठे परंतु लहानपणीच आई गेली देवाघरी
कोवळ्या रमाईच्या मनावर आघात झाला खोलवरी ||
कालांतराने वडिलांचे निधन झाले चिंतेत
मामासोबत रवानगी झाली मुंबईत ||
बालविवाहाची प्रथा होती तेव्हा समाजात
१९१६ मधे लग्न झाले भायखळ्याच्या जागेत थाटात ||
बाबासाहेब आंबेडकरांचे वय होते फक्त १४ वर्ष
रमाई चिमुकली होती वय होते ९ वर्ष ||
रमाईने खूप संघर्ष केला आपल्या जीवनात
पतीच्या शिक्षणासाठी पाठवले तिने परदेशात ||
एकट्या पडल्या रमाई दुःखी कष्टी होऊन
जिद्दीने दुःख अडचणीवर मात केली रमाईन ||
पतीची स्वाभिमानी पत्नी होती ती एक
कष्टाने जीवन जगत होती समाजात ||
समाजाची मदत नाकारली तिने स्वाभिमान
उदर निर्वाहासाठी शेण, गोवऱ्या वेचल्या वनात ||
दोन्ही मुलांचा मृत्यू पहिला एकट्या महिलेनं
मुलांच्या निधनाचे दुःख सांगितले नाही पत्नीन ||
कष्ट करून त्यांचे शरीर पोखरत गेले एक दिवस
२७ मे १९३५ रोजी प्राण ज्योत मावळली कष्टात ||
रमाईचे बलिदान विसरणार नाही भारत देश
वंदन करते मी मातेला दोन्ही हात जोडून ||
सौ. मंगला सुधाकर कुमावत.
सेवानिवृत्त मुख्याध्यापिका
माध्यमिक विद्यालय, गणेशपुर.
चाळीसगाव. जिल्हा. जळगाव.
मो. ९४०५४४६२९२.