रेवदंडा येथून 29 वर्षीय महिला बेपत्ता
अलिबाग - अमुलकुमार जैन
रेवदंडा येथून 29 वर्षीय कुमारी सिध्दी दिलिप काटवी ही राहत्या ब्लॉक मधून बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे पाल्ाकांनी रेवदंडा पोलिस ठाणे कडे केली आहे.
कुमारी सिद्धी दिलीप काटवी व 29 वर्ष राहणार गोरेगाव मुंबई ही नोव्हेंबर 2024 पासून त्यांचे रेवदंडा येथील ब्लॉक मध्ये राहावयास आलेली होती. तिची मानसिक स्थिती ठीक नव्हती व ती सतत चिडचिड करीत होती.
दिनांक सहा ऑगस्ट 2025 रोजी मुलीचे आई-वडील रेवदंडा येथील ब्लॉकवर त्यांचे मुलीला भेटण्यास आले असता ती सदर ठिकाणी मिळून आली नाही तसेच तिचा मोबाईल देखील बंद येत असल्याने ती कुठेतरी हरवली असल्याबाबत खात्री झाल्याने तिचे वडील दिलीप चंद्रकांत काटवी रा.गोरेगाव यांनी रेवदंडा पोलीस ठाणेत तक्रार दिल्यानुसार रेवदंडा पोलीस ठाणे मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर 11/2025 प्रमाणे नोंद दाखल करण्यात आली आहे.
सदर मिसिंग चा तपास पोलीस हवालदार महेंद्र राठोड हे करीत आहेत.
मिसिंग मुलीचे वर्णन- रंग निमगोरा, उंची - पाच फूट, बांधा - सडपातळ, पोशाख - मरून रंगाचा पंजाबी ड्रेस, कानात आर्टिफिशियल टॉप,पायात हिलच्या चप्पल आहेत
