न. ग. पाटील यांच्या नाटकाला स्वाभिमानी साहित्य सेवा पुरस्कार
अलिबाग (वार्ताहर)
श्री न.ग.पाटील , भाकरवड (देहेन ) ता. अलिबाग. यांच्या ' देव गेला दिगंतरा ' नाटकाला अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५ कराड (सातारा ) येथे १ जुलै २०२५ रोजी स्वाभिमानी साहित्य सेवा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे .
या पूर्वी याच नाटकाला ' धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलन फलटण येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी उत्कृष्ट साहित्य सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
तसेच त्यांच्या ' आगरी कोळी संस्कृती ' या कादंबरीस ११ एप्रिल २०२५ रोजी थिम्पू (भूतान) येथे झालेल्या अंतरराष्ट्रीय आगरी अस्मिता साहित्य संमेलनात ' म. ना. पाटील वाड्मय पुरस्काराने ' गौरविण्यात आले आहे.
