तीच्या भावना
स्वतः च्या जळालेल्या भावनांवर पाणी सोडतांना,आयुष्याचा गाडा हाकलतांना,मनात आले सारेच हिशोब,केलेली काटकसर, वेचलेले कष्ट,भोगलेले दुष्काळ, खाललेला शब्दांचा मार आणि,तीच्याच नात्यांनी ते पगद्यामागून पाहीलेलं तीचं चित्र,तीच्या होणाऱ्या उध्वस्त स्वप्नांचे..
ठेवले तीने सारेच झाकून जसेच्या तसेच अगदी नीट,चैनीच्या वस्तू,धनदौलत, आपली माणसे आणि तीच्या मनातील आपुलकीचे दाखले, स्वप्नात खेळणारी बेगळी सुखे,संसाराच्या नयनरम्य शीतल छायेत, स्वतःच्याच मेल्यागत देहासमोर जपून..,
विनवण्या करून तीने हात जोडले,पडला संसार ऊभा करण्यासाठी,कारण हे जीवन परत येणार नाही.आता वाटतं कदाचीत हे जीवन परत येईलही,पण,पण ती तेव्हा असेल कुठेतरी एकटीच,आणि तो कुठेतरी एकटाच,पश्चतापाच्या जाळ्यात अडकलेला एखाद्या कैद्याप्रमाणे...
संगीता बोरकर-बांबोळे
गोंडपिपरी,चंद्रपूर
मो:9405718463